रायरी
उर्फ रायगड महाराजांनी जावळीच्या मोरेंकडुन जिंकुन घेतला आणि पुढे त्याचे
नाव ठेवले रायगड. पुढे याच रायगडाने स्वराज्याचे वैभव अनुभवले. हा रायगड
अभेद्य होता.. असाध्य होता..स्वतंत्र होता.. आजही आहेच. अगदी 'केळदिनुपविजयम्' या ऐतिहासिक कानडी काव्यांतही रायगडचे वर्णन
"भुतलांत (पृथ्वीवर) आश्चर्यकारक म्हणून गणला जाणारा रायरी" असे केले आहे.
हा रायगड असा कसा?
महाराजांनी जर या किल्ल्याचा वापर राजधानी म्हणुन करायचा ठरवला होता तर
त्यामागे कारणे होती; गडाची नैसर्गिक अभ्येद्यता, ताशीव कडे, सह्याद्री
पासुन वेगळा झालेला डोंगर ..... याच बरोबर किल्याचे बांधकाम आणि नंतर
स्थापत्य कला.
महाराजांनी कल्याणचा सुभेदार आबाजी
सोनदेव यांस आज्ञा करून रायगडावर राजधानीस त्या इमारती बांधण्यास सांगितले.
हिरोजी इंदुलकर (कि इटळकर?) यांनी ते बांधकाम केले. हिरोजींनाच या
राजधानीचे बांधकाम का मिळाले असेल बरं? तर त्यामागे ही एक गोष्ट आहे-
महाराजांनी सुरत लुटुन त्या पैश्यातुन सिंधुदुर्ग बांधला.. त्याचे
बांधकामही हिरोजींनीच केले, मात्र बांधकाम चालु असतानाच पैसा संपला आणि
बांधकाम थांबले, याही वेळेस (असेच रायगडलाही झाले) हिरोजींनी जमीन जुमला
विकला आणि गडाचे बांधकाम पुर्ण केले. महाराज गडावर आल्यावर त्यांनी विचारले
हिरोजींना; की बोला हिरोजी काय हवयं? त्यावर हिरोजी म्हणाले- महाराज
ज्यावेळी राजधानी बांधाल.. त्यावेळी ते बांधण्याच सौभाग्य मला द्या..आणि
म्हणुनच राजधानी बांधण्याचे जिकरीचे काम हिरोजींना मिळाले. (पुढे रायगड
बांधतानाही हा असाच प्रसंग घडला, तो सारा आपण जाणताच.)
सन
1656 ते 1674 असे तब्बल अठरा वर्ष रायगडाचे बांधकाम चालु होते.
या कालावधीत रायगडावर भक्कम तटबंदी, गोमुखी महाद्वार, , नानाविध दरवाजे, राजवाडा, राजदरबार, नगारखाना, राणी महाल, धान्य कोठारे, दारू कोठारे, टांकसाळ, अष्टप्रधान वाडे, राणी महाल, युवराजांसाठी महाल, गंगासागर सारखे तलाव, स्तंभ, शिव मंदिरे, शिर्काई देवी मंदिर, शिंबंदीच्या रहायच्या जागा, पर्जन्यमापक, हत्तीशाळा,अश्वशाळा, चोर दरवाजा, यांसारख्या तीनशे वास्तु बांधल्या. यासाठी जवळपास 50 हजार होन खर्च झाले असावेत.
या कालावधीत रायगडावर भक्कम तटबंदी, गोमुखी महाद्वार, , नानाविध दरवाजे, राजवाडा, राजदरबार, नगारखाना, राणी महाल, धान्य कोठारे, दारू कोठारे, टांकसाळ, अष्टप्रधान वाडे, राणी महाल, युवराजांसाठी महाल, गंगासागर सारखे तलाव, स्तंभ, शिव मंदिरे, शिर्काई देवी मंदिर, शिंबंदीच्या रहायच्या जागा, पर्जन्यमापक, हत्तीशाळा,अश्वशाळा, चोर दरवाजा, यांसारख्या तीनशे वास्तु बांधल्या. यासाठी जवळपास 50 हजार होन खर्च झाले असावेत.
35 हजार होन दिगि घरें.-
15 हजार होन तट-
10 हजार होन गच्ची. (हे समजत नाही, बहुदा स्तंभ, नगारखाना आणि इतर साठी) एवढा खर्च केला गेला.
15 हजार होन तट-
10 हजार होन गच्ची. (हे समजत नाही, बहुदा स्तंभ, नगारखाना आणि इतर साठी) एवढा खर्च केला गेला.
(20 हजार होन तळीं, 2,5 हजार होन किल्ले.)
[संदर्भ- राखं. 8 पु 18 ले. 22. पसासं 1459.]
हे
झाल रायगडावरील बांधकाम.. आता स्थापत्य बघुयात. रायगडाबद्दल सांगताना
म्हणतात (ही कथा कदाचित दंतकथा असावी) रायगड बांधुन झाल्यावर महाराजांनी
हिरोजींना (कि हिराजी) विचारले कि सांगा राजधानी कशी आहे? त्यावेळी हिरोजी
म्हणाले महाराज गडावरून महादरवाजा सोडल्यास वरून खाली फक्त पाणी, आणि खालुन
वर फक्त वाराच जाऊ शकतो. अतिश्योक्ती सोडली तर हे खरंच आहे. गडाचे बांधकाम
पुर्ण झाल्यावर तट व बुरूज बांधुन झाल्यावर आणि तोफा वर नेऊन जागा
सुरक्षित केल्यावर महाराजांनी महादरवाजा बंद केला आणि लोकांना जमा केले अणि
एक सोन्याने भरलेली एक पिशवी व शंभर होनांचे कडें पुढे ठेऊन जाहीर केले की
जो कोणी वीर शिडी किंवा दोर यांच्याशिवाय व महादरवाज्या शिवाय किल्यावर
चढुन येईल त्यास हे बक्षीस देण्यात येईल. तेव्हा एका व्यक्तीने गड चढला आणि
महाराजांना रामराम केला. महाराजांनी त्याला बक्षीस देऊन तो रस्ता कायमचा
बंद केला. (बहुदा हीच कथा पुढे हिरकणी नावाने प्रसिद्ध झाली असावी.)
हे सारे यात यासाठी की रायगड अभेद्य करण्यात या सार्याचा सिंहाचा वाटा होता; चुकुन एखादी वाट रहायला नको आणि नको ते घडायला नको.
आता आपण बघुयात गडावरील स्थापत्य.
गडावरील
बांधकाम हे मराठा पद्धती बरोबरच इतर पद्धतीचेही आहे.
उदा- स्तंभ हे
निजशाही पद्धतीचे आहेत. जगदिश्वराचा कळस हा मुसलमानी पद्धतीचा आहे.
गडावरील स्थापत्य- भाग 1 द्वार (दरवाजा).
महादरवाजा:-
रायगडवर जाणारी कोणतीही वाट ही पुढे महादरवाज्यालाच मिळते. (नाना दरवाजा, चित्त दरवाजा, वाळुसरे खिंड) हा दरवाजा गोमुखी असुन शत्रुला शेवट पर्यंत दिसत नाही. आपलेच काही मराठी माणसं फक्त जंजिराला जाऊन त्याचा दरवाजा बघतात आणि आपल्याला सांगतात कि तो दरवाजा दिसत नाही तेव्हा त्यांची खरच किव येते. असे दरवाजे आपल्या बर्याच किल्यांना आहेत. (असही जंजिराला सांगितला जाणारा इतिहास हा 95% खोटाच आहे.) या दरवाज्याला दोन बुरूज आहेत.. डावीकडील 65 फुट उंच आणि उजवीकडील 75 फुट उंच आहे. या दरवाज्यावर दोन्ही बाजुस कमळपुष्प आहेत, याचा अर्थ होतो की या ठिकाणी लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत आहेत. या दरवाज्यातुन आत गेल्यावर उजवीकडील जागेत एक शिलालेख आहे. पुसट झाल्यामुळे त्याचे वाचन मात्र करता येत नाही. सध्या यावर शेंदुर लावला आहे त्यामुळे ही जागा लगेच नजरेस भरेल. गडावर येणाऱ्या बर्याच लोकाना हा शिलालेख माहीतच नसतो.
रायगडवर जाणारी कोणतीही वाट ही पुढे महादरवाज्यालाच मिळते. (नाना दरवाजा, चित्त दरवाजा, वाळुसरे खिंड) हा दरवाजा गोमुखी असुन शत्रुला शेवट पर्यंत दिसत नाही. आपलेच काही मराठी माणसं फक्त जंजिराला जाऊन त्याचा दरवाजा बघतात आणि आपल्याला सांगतात कि तो दरवाजा दिसत नाही तेव्हा त्यांची खरच किव येते. असे दरवाजे आपल्या बर्याच किल्यांना आहेत. (असही जंजिराला सांगितला जाणारा इतिहास हा 95% खोटाच आहे.) या दरवाज्याला दोन बुरूज आहेत.. डावीकडील 65 फुट उंच आणि उजवीकडील 75 फुट उंच आहे. या दरवाज्यावर दोन्ही बाजुस कमळपुष्प आहेत, याचा अर्थ होतो की या ठिकाणी लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत आहेत. या दरवाज्यातुन आत गेल्यावर उजवीकडील जागेत एक शिलालेख आहे. पुसट झाल्यामुळे त्याचे वाचन मात्र करता येत नाही. सध्या यावर शेंदुर लावला आहे त्यामुळे ही जागा लगेच नजरेस भरेल. गडावर येणाऱ्या बर्याच लोकाना हा शिलालेख माहीतच नसतो.
या दरवाज्यातुन आत गेल्यावर
पुढे लगेच डावीकडे दरवाज्याच्या शिबंदिची जागा आहे. दरवाज्याचे गोमुखी वळण
पार केल्यावर परत दोन बुरूज लागतात.. ते मोरेंच्या काळातील असावेत आणि
महादरवाजा ते हे बुरूज असा त्यावेळेस मार्ग असावा. गोमुखी महादरवाजा
बांधण्या अगोदरचा तो मार्ग असावा.
श्री. प्र. क
घाणेकरांनी मांडलेल्या कल्पनेप्रमाणे रायगडावर दुर्ग विज्ञान वापरले आहे.
रायगडची वाट ही गड उजवीकडे ठेऊन आहे, म्हणजे शत्रुच्या उजव्या हातात तलवार
असली आणि वरून साधा दगड जरी फेकला तरी तो अडवण्यासाठी त्याला डाव्या
हातातील ढाल पुढे करावी लागेल आणि तो अडकून राहील.
या दरवाज्यातुनही शत्रु आत आलाच तर तो दरवाज्याची रचना बघुन चक्रावेल..
कारण बहुतांश गडावर मुख्य दरवाजा ओलांडल्यावर सरळ जाण्यास मार्ग असतो, इथे
मात्र उलट आहे.. इथे जागेवरच वळण घ्यावे लागते. आणि इथुन पुढची वाटही सोपी
नाही तर दमवणारीच आहे. सरळ सोट पायर्या आहेत ज्या दमवतातच. म्हणजे जरी
शत्रुने महादरवाजा पार केला तरीही तो वर येईपर्यंत थोडा कालावधी मिळेल आणि
प्रतिकार करता येईल.
नाना
दरवाजा :-
हा नाना दरवाजा म्हणजेच शिवकाळात गडावर येण्याचा राजमार्ग होता. याची बांधणीही महादरवाज्यासारखीच असुन याला छोटा महादरवाजा म्हणाल्यास वावगं ठरणार नाही. राजाभिषेकास आलेला इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन हाही याच मार्गाने रायगडावर आला होता.
हा नाना दरवाजा म्हणजेच शिवकाळात गडावर येण्याचा राजमार्ग होता. याची बांधणीही महादरवाज्यासारखीच असुन याला छोटा महादरवाजा म्हणाल्यास वावगं ठरणार नाही. राजाभिषेकास आलेला इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन हाही याच मार्गाने रायगडावर आला होता.
आजमीतीस या
दरवाज्यातुन रहदारी होत नसल्यामुळे आणि ही वाट फारशी प्रचलित नसल्याने या
दरवाज्याची अवस्था बिकट आहे. वास्तविक पाहता हाच राजमार्ग होता, चित्त
दरवाज्यातुन लागणार्या उन्हा पासुन वाचण्यासाठी आणि डोंगरी मार्गाचा अनुभव
घेण्यासाठी हाच मार्ग वापरायला हवा. या दरवाज्यातुन जाताना लागणार्या
पिण्याच्या पाण्यासाठी इथे एक टाकही होतं.. सध्या ते आढळत नाही, माती आणि
राडारोडा जाऊन ते बुजलं असावं. या नाना दरवाज्यास दोन कमानी आहेत, या दोन
कमानीतील अंतर दहा फुट आहे, पहील्या कमानीची उंची 12 फुट तर दुसर्या
कमानीची उंची 14 फुट आहे. दरवाज्याच्या दर्शनी भागात दोन बुरूज आहेत जे
वीस फुट उंच आहेत. दरवाज्याच्या आतील बाजुस दगडात पहारेकर्यांसाठी दोन
खोल्या आहेत. 1974 च्या पुर्वी या दरवाज्याच्या एका कानोड्यात एका हत्तीची
ओबढधोबड प्रतिमा होती, आता ती नाही. (सं- दुर्गदुर्गेश्वर रायगड. पान-47). या दरवाज्या पासुन महादरवाजा जवळपास 1000 (एक हजार) फुट उंचीवर आहे.
वाघ दरवाजा (चोर दरवाजा) :-
वाघ दरवाजा (चोर दरवाजा) :-
रायगडावर असलेल्या मुख्य दरवाज्याशिवाय अडचणीच्या
वेळेला उपयोगी पडावा म्हणुण बांधला गेलेला हा चोर दरवाजा. "किल्यास एक
दरवाजा थोर अयब आहे" (म्हणजे किल्यास एकच दरवाजा असणे हे चुकीचे आहे.) "याकरीता एक दोन तीन दरवाजे तसेच चोरदिंड्या करून ठेवाव्यात" असे
रामचंद्रपंत अमात्य 'आज्ञापत्र' या ग्रंथात सांगतात. म्हणुणच गडावर मुख्य
दरवाज्याशिवाय याची उभारणी झालेली असावी. हा दरवाजा कुशावर्त तलावाच्या
पुढे उतारावर आहे. हा दरवाजा आजही भक्कम बांधणीचा आहे... मात्र इथवर
जाण्याची वाट थोडी अवघड आहे. इथुन खाली उतरण मात्र महाभयंकर. प्रस्तारोहनाच (क्लाइंबिंग)
तंत्र वापरून खाली उतरावे लागेल. पुर्वी इथुन खाली उतरण्यास
रस्ता (किमान पाऊलवाट) असावी, राजाराम महाराजांनी याच मार्गे रायगड
सोडल्यानंतर ती मोडण्यात आली असावी. येथुन जवळच काळघाईची गुहा आहे.

चित्त
दरवाजा:-
सध्या पाचाडवरून जी वाट गडावर जाते ती खुबलढा बुरुजाच्या येथुन गडावर येते. सध्या याठिकाणी चित्त दरवाजा अशी पाटी असली तरी या दरवाज्याचे कोणतेही कसल्याही प्रकारचे अवशेष नाहीत. खुबलढा बुरूजालाच लागुन हा दरवाजा पुर्वी असावा. आत्ता मात्र फक्त बुरूज आहे.
सध्या पाचाडवरून जी वाट गडावर जाते ती खुबलढा बुरुजाच्या येथुन गडावर येते. सध्या याठिकाणी चित्त दरवाजा अशी पाटी असली तरी या दरवाज्याचे कोणतेही कसल्याही प्रकारचे अवशेष नाहीत. खुबलढा बुरूजालाच लागुन हा दरवाजा पुर्वी असावा. आत्ता मात्र फक्त बुरूज आहे.
गडावरील स्थापत्य - भाग 2...
पाण्याची व्यवस्था... लवकरच
Great work Harsh- Milind Kshirsagar
ReplyDeleteखूप छान आता पर्यत 8 ते10 वेळा रायगड दर्शन झालं असेल पण अभ्यास पूर्ण दर्शन आता होत आहे..👌🏻👍🏻🙏🏻⛳
ReplyDeleteखुप अफलातून.....
ReplyDeleteखुप छान👌
ReplyDeleteमस्त भावा....
ReplyDeleteKhup chan Harsh
ReplyDeleteखूप छान माहिती आहे.
ReplyDeleteHiroji INDULKAR yanchai full informastion ahe ka
ReplyDeleteNhi na bhava ajun
DeleteHiroji INDULKAR yanchai full informastion ahe ka
ReplyDeleteHiroji INDULKAR yanchai full informastion ahe ka
ReplyDelete