Wednesday, 25 March 2020

फोंडा कोट आणि मराठे पोर्तुगीज युद्ध. गोवा


     फोंडा कोट आणि मराठे पोर्तुगीज युद्ध.

स्थळ - गोवा


गोवा, देशातील सर्वात प्रसिदध पर्यटन स्थळांपैकी एक राज्य.  
गोव्यातील समुद्र, बीच, मंदिर आणि चर्च या सोबतच किंबहुना याहून अधिक महत्वाचा आहे तो तिथला इतिहास. जयकेशी कदंबापासून ते अगदी अलीकडील मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या पर्यंतचा.
याच गोव्यात पोंडा (फोंडा) हे नाव सगळ्यांनी ऐकले असेल, त्याच पोंडा किल्याचा हा थोडासा इतिहास. 
Photo - Google.

८ नोव्हेंबर १६८३ रोजी पोर्तुगीज विजरई कोंद-दी-आल्व्हर याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांनी फोंडा कोटावर तोफांचा मारा करून कोटाच्या तटाला मोठे भगदाड पाडले, हळू हळू तोफा आणि बंदुकीचा मारा करून हा कोट ताब्यात घ्यायचा विरजईचा विचार होता. 
रात्र झाली होती आणि लढाई थांबली होती, कोटाच्या आतील मराठे सैनिक त्यावेळी "काळ" बनून समोर ठाकलेल्या पोर्तुगीजांशी लढायला सज्ज होते. तिकडे देशावर छत्रपती संभाजीराजे मुघल, डच, इंग्रज, यांच्याशी लढतानाच्या आणि पराक्रमाच्या बातम्या ऐकून साऱ्या मराठ्यांच्या अंगात शौर्य धावत होत, आता काहिही झालं तरी माघार नाही, हा त्यांनी ठाम निर्णय घेतला होता. सोबतीला दैव असावं म्हणून देव देवाला, पिराला नवस केले होते... आणि त्यारात्री देव पावला. रात्री अचानक पाऊस पडायला सुरुवात झाली, अचानक आलेल्या पावसामुळे पोर्तुगीजांची तारांबळ उडाली, त्यांचा दारुसाठा भिजला आणि निकामी झाला.

आता या पेक्षा चांगली गोहत ही झाली की ९ नोव्हेंबरच्या सकाळी स्वत: छत्रपती संभाजी महाराज राजपुरीहून  ९०० घोडेश्वार आणि २ हजार पायदळासह फोंड्याच्या कोटाजवळ येऊन पोहोचले. (अंतर तब्बल 450 km)  स्वतः छत्रपती आले हे बघून गडावरची लोक धन्य झाली, आता फोंडा तर देत नाहीच, पण सोबत गोवाही ताब्यात घेऊ इतका विश्वास आला. हा विश्वास आणि छत्रपतींना बघून विरजईने माघार घेतली, पोर्तुगीज सैन्य पळत सुटल. कोटातून पळणाऱ्या सैन्यावर बंदुकीचा मारा चालू झाला. पळून गेल्यामुळे तोफा बंदूकांसह ३०० पोती भात आणि २०० गाढवांवर राहिल एवढे सामान पोर्तुगीज घाबरून सोडून गेले, जीव वाचवा म्हणून. पोर्तुगीज पळून गेले ते दुर्भाट बेटावर ;पोर्तुगीजांचे बाकीचे सामान जसे की होड्या ई इथेच होते.
 याच ठिकाणी मराठे आणि पोर्तुगीज सैन्य जिथे गव्हर्नर होता, गनिमी काव्याच्या पध्दतीने लढलेल्या या युद्धात  जनरल रोद्रीगो द कोस्ता, कॅप्टन मानुएल सिल्वा आणि 200 पोर्तुगीज सैन्य मारले गेले.  यात स्वतः छत्रपती संभाजी महाराज युद्धात उतरले होते, बेटावर सर्वत्र रक्ताचा, मांसाचा खच पडला होता.  या लढाईत मराठ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीची सवंगडी येसाजी कंक, आणि त्यांचा मुलगा बाजी कंक यांनीही मैदान गाजवले. या लढाईत मात्र पोर्तुगीज व्हाइसरॉय निग्रो अंगरक्षकांमुळे वाचला...
पोर्तुगीज गव्हर्नर असा दिसत असेल ( चित्र रचनात्मक आहे)

 ज्या पोर्तुगीज गव्हर्नर, विरजई ने छत्रपती संभाजी महाराजांना जिवंत पकडून मारायचा बेत केला होता, ते सगळे या लढाईत  जखमी झाले, आणि  असे बसे जुन्या गोव्यात जाऊन पोचले.
पोर्तुगीज गव्हर्नर, विरजई आणि सैनिक सगळेच घाबरून जुन्या गोव्यात पळाले...
पोर्तुगीज सैन्य अस दिसत असेल ( चित्र रचनात्मक आहे)

या पुढे काय झालं? पुढच्या भागात.
 (टीप   फोंडा या किल्याचे जास्त  अवशेष सध्या नाहीत, त्याजागी जवळच  प्रशासनाने शिवाजी फोर्ट उभारला आहे. )
Photo- Shivaji Fort.
https://goo.gl/maps/rdsnP9FLCLabctZY6
संदर्भ - 
1.मराठे पोर्तुगीज संबंध.
2.श्री. सचिन मदगे यांचे लेखन.
3.गुगल, गोव्यातील संग्रहालये आणि स्थानिक लोकांची माहिती.

No comments:

Post a Comment